Total Pageviews

33563

Monday, November 8, 2010

उरतील फक्त आठवणी...

उरतील फक्त आठवणी त्या सांजवेळेची
तुझी ...माझी अन त्या हळव्या क्षणांची...

उरेल खुण त्या तुटलेल्या स्वप्नांची
कधी हातात गुंफलेल्या नाजूक बंधनाची...

पुसशील हलकेच कड पापणीची
जाणवेल तुलाही खुण कोरड्या आसवांची...

विरेल कधीतरी हि गाठ भावनांची
लपवशील मग हि सर हळवी पावसाची...

सांग !! तरी तुटतील का नाती आपल्या मनांची
विसरशील का कधी माझी प्रीत अबोल शब्दांची ?

कोमल ...............................८/११/१०

No comments:

Post a Comment