Total Pageviews

33607

Saturday, March 27, 2010

मनातल्या .............चारोळ्या


बऱ्याच वेळा मी
माझीच नसते
कोणत्यातरी जगात
हरवलेली असते ......

अशीच आहे मी
थोडी वेडी अन विचित्र
जागेपणीच रंगवत असते
मी स्वप्नांची चित्र......

उगाचच कधी कधी
मनाचे आभाळ भरून येते
मग नकळतच आठवणींनी
डोळ्यात दाटून येते.......

पंख तर केव्हाच छाटले
आता तर स्वप्नही अंधुक झाली
मावळत्या सूर्यासोबत
आता सावलीही नाहीशी झाली......

तुझ्या सोबत घालवलेला
प्रत्येक क्षण ताजा होतो
त्या क्षणांसाठी का होईना
तू फक्त माझा असतोस.......

आठवणींच जग
किती विचित्र असते
कधी गर्दीत एकटे तर
कधी मनात गर्दी करते......

दाटलेल्या नयनात
तुझाच भास आहे
शेवटच का होईना
आता फक्त तुझीच आस आहे......

कुणास ठाऊक हे
क्षण कधी संपतील
कदाचित हे माझे
शेवटचे शब्द असतील........

त्या शेवटच्या क्षणीही
मी किती शांत होते
बस !! तुला डोळे भरून
शेवटचं पाहत होते.......

आयुष्याच पान कधी गळून
पडेल याचा नेम नाही
यासाठी कोणत्याही
ऋतुच त्याला बंधन नाही.......

मृत्यू हे एक अगदी
विदारक सत्य आहे
कोणालाही न सोडवता येणारे
ते एक रहस्य आहे........

कोमल ....................२८/३/१०

1 comment: