Total Pageviews

33495

Tuesday, June 1, 2010

काही उरलंच नाही ...

हरवायची आता काही भीती राहिली नाही
कारण गमावण्यासाठी आता काही उरलंच नाही ...

आजकाल डोळेही भरून येत नाही
कारण रडण्यासाठी आता अश्रूही शिल्लक नाही ....

कोणाशीही बोलावस वाटत नाही
कारण आता शब्दांनाही माझ्यासाठी वेळ नाही ....

आजकाल कोणालाही प्रश्न विचारत नाही
कारण त्यांची उत्तर माझ्याहीकडेही नाही ....

उगाचच जास्त डोक चालवत नाही
म्हणजे नंतर ते त्याच अस्तित्वही दाखवणार नाही ...

स्वप्नही आजकाल बघत नाही
म्हणजे ती तुटण्याचा त्रासही होणार नाही ...

नशिबाचे चटके कदाचित पुरे झाले नाही
म्हणून अजूनही मी अनवाणी चालायची सवय सोडली नाही ...

कोमल ...........................१/६/१०

No comments:

Post a Comment