Total Pageviews

Sunday, February 27, 2011

नकळत सांजवेळी ...

नकळत सांजवेळी कुणीतरी येऊन जाते
मनाला माझ्या अस्वस्थ करून जाते ...

कुणीतरी ओळखीचे असावे.. उगाच वाटून जाते
मनात विचारांचे असंख्य वादळ घोंगावून जाते ...

मनाचे खेळच असावे असे उगाच वाटून जाते
कोणीतरी असल्याचे आभास जाणवून जाते ...

अस्पष्ट... धूसर... काहीस आठवून जाते
मनावरचे पडदे जेव्हा मी दूर सारून जाते

असेच सांजवेळी कुणीतरी येऊन जाते
नकळत आठवांचे आभाळ पुन्हा दाटून जाते ...

कोमल ...........................................................२७/२/११

No comments:

Post a Comment