Total Pageviews

Saturday, August 7, 2010

कधीकधी असंही.........

भिजलेल्या आठवणींसोबत कधीतरी जगायचं असत
सगळ्यांना सोडून कधीतरी एकटच राहायचं असत
खोट्या विश्वासाने स्वतःलाच सावरायचं असत

तुटलेल्या मनाने मनसोक्त वावरायचं असत
कधी कोसळणाऱ्या सरीत अश्रूंना लपवायचं असत
कधी विषही गोड मानून संपवायचं असत

आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं असत
दाटलेला हुंदक्याला तसंच धरून ठेवायचं असत
भरलेल्या पापण्यांना तसच मिटायच असत

कधी गालात तर कधी मनातच हसायचं असत
मनातल्या वादळाला तिथेच शमवायचं असत
विचारांच्या गुंत्याला हळुवार उलगडायचं असत

काही आठवणींना विसरायचं असत
आयुष्याच्या गर्दीत स्वतःला हरवायचं असत
आपल्याच सावली सोबत फक्त चालायचं असत

कोमल ..................................८/८/१०

No comments:

Post a Comment