Total Pageviews

Tuesday, May 18, 2010

मनास माझ्या........

मनास माझ्या कळेना का असे झाले
उगाच त्याला एकटे रहावेसे वाटले
गोंधळातही शांततेचे स्वर आले
आपलं बोलणारेहि आज अनोळखी वाटले
सगळेच चेहरे फक्त भासासारखेच जाणवले
आजूबाजूला फिरणाऱ्या देहांचेही अस्तित्व नाही उरले
आणि त्यात माझ्याच अस्तित्वाची जागा शोधत फिरले
क्षणभर एक सत्य पटले
उगाच कशाला कोणामध्ये हरवावे
एक दिवस जेव्हा तोही आपले अस्तित्वच नाकारेल
तेव्हा नंतर तुटण्यापेक्षा आजच स्वतःला सांभाळावे
म्हणून कदाचित माझ्या मनाला आज एकटे रहावेसे वाटले

कोमल .......................१९/५/१०

No comments:

Post a Comment