Total Pageviews

Saturday, March 27, 2010

आयुष्य ............काही चारोळ्या


आयुष्य नसते
फक्त सुरेख वाट
कधी कधी असतात
काटेही हजारो त्यात ...........

आयुष्याच गणित
बऱ्याचदा चुकत
अन मग बाकी शून्य पाहून
आपल्याला वाईट वाटत ..........

आयुष्य असते का
फक्त सुंदर कविता ?
कधीतरी आपल्याच चुकांनी
ती बनते वात्रटिका ..........

आयुष्य असाव
समुद्र सारख
सगळ्यांना आपल्यात
सामावून घेणार .........

आयुष्य असाव
फुलपाखरासारख
कमी असूनही
सगळ्यांना आनंद देणार ...........

आयुष्यात सुख
नेहमीच देत रहाव
कधी न मागताच
दुसर्यांचे दुःख हि घेत रहाव ...........

कोमल ...................६/३/१०

1 comment: